This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47116366.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2017-01-16. The original page over time could change.
Finally, a push for labour reforms - Maharashtra Times
  • MT
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • कोल्हापूर
  • अहमदनगर
  • नाशिक
  • जळगाव
  • नागपूर

महाराष्ट्र

  • आपण इथे आहात - 
  • होम » 
  • महाराष्ट्र » 
  • Finally, a push for labour reforms

सावध ऐका कामगार कायद्यांच्या हाका

Share on Facebook

सावध ऐका कामगार कायद्यांच्या हाका



समर खडस

महाराष्ट्रात आलेले भाजपप्रणित सरकार मराठी कामगारांच्या दृष्टीने कोणती पावले टाकू इच्छित आहे, हे या कामगार दिनानिमित्ताने समजून घ्यायला हवे. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर त्यांनी 'मेक इन इंडिया'ची घोषणा केली. त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मेक इन महाराष्ट्र' ही घोषणा केली आहे.

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्राने आघाडी घ्यावी, यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे उद्दिष्ट हे सध्या तिसऱ्या जगातील प्रत्येक राज्यकर्त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचेही आद्य कर्तव्यच झाले आहे. गुंतवणूक व्हावी यासाठी सर्वच राज्यकर्ते उतावीळ झाल्याने गुंतवणूकदारांसमोर अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. या स्पर्धेतून गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार होते, असा सर्वसाधारण समज आहे. पोषक वातावरण म्हणजे काय, तर जे कायदे किंवा अटी गुंतवणूकदारांना जाचक वाटतात, त्या काढून टाकण्याची पावले सरकार उचलते. फडणवीस यांनी याच दृष्टीने राज्यातील सर्व महत्त्वाच्या कामगार संघटनांना एक पत्र पाठवले असून, त्यात महत्त्वाच्या कामगार कायद्यांमध्ये बदलांबाबत त्यांचे मत नोंदवण्यास सांगितले आहे.

हे कायदे बदलायचेत

राज्य सरकारला 'मेक इन महाराष्ट्र' यशस्वी करण्यासाठी ज्या कायद्यांमध्ये बदल करावेसे वाटतात, त्यातील प्रमुख कायद्यांमध्ये महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट, इंडस्ट्रीयल डिस्प्युट अॅक्ट, महाराष्ट्र माथाडी, हमाल अँड अदर मॅन्यूअल वर्कर्स अॅक्ट, महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डस् अॅक्ट, मोटर ट्रान्सपोर्ट अॅक्ट, बीआयआर अॅक्ट, एमआरटीयू अँड पीयूएलपी अॅक्ट आदी कायद्यांचा समावेश आहे.

'कलह' कलम '२५-ओ'चा

यातील महत्त्वाचा कायदा आहे तो इंडस्ट्रीयल डिस्प्युट अॅक्ट किंवा औद्योगिक कलह कायदा १९४७. या कायद्यातील '२५-ओ' हे कलम गुंतवणूकदारांना व त्यांच्यामुळेच राज्यकर्त्यांना गुंतवणूक व पर्यायाने विकासातील मोठा अडसर वाटते. या कलमानुसार ज्या कारखान्यात १०० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतील, तो कारखाना बंद करताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. राजस्थान सरकारने नुकताच हा कायदा बदलून १०० कामगारांची मर्यादा ३०० कामगारांवर नेली. आता यातील वास्तव थोडेसे समजून घेतल्यास काय दिसते, तर 'अॅन्यूअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज'च्या २०१४च्या अहवालानुसार, देशात २०११-१२साली कामगार कायदे लागू असलेल्या कामगारांची संख्या एक कोटी ३४ लाख होती. देशातील एकूण कामगार संख्येपैकी ९२ टक्के कामगारांना मुळातच कामगार कायदे लागू होत नाहीत. कारण ते असंघटित क्षेत्रात मोडतात. हे एक कोटी ३४ लाख कामगार देशभरातील एक लाख ७५ हजार ७१० छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये काम करतात. त्यातील एक लाख २५ हजार ३१० कारखान्यांमध्ये ५०हून कमी कामगार काम करतात. त्यामुळे या कारखान्यांना औद्योगिक कलह कायद्याचे कलम २५-ओ लागूच होत नाही. देशातील बहुतांश कारखाने हे या कायद्याच्या अखत्यारित त्यामुळे येतच नाहीत. देशात २०० ते ५०० कामगार असलेल्या कारखान्यांची संख्या अवघी ८.९४ टक्के, तर पाच हजारहून अधिक कामगार असलेल्या कारखान्यांची संख्या अवघी ०.२१ टक्के एवढीच आहे.

कायद्यात बदल कशासाठी?

कॉन्ट्रॅक्ट लेबर अॅक्ट किंवा कंत्राटी कामगार कायद्यानुसार, २०पेक्षा अधिक कंत्राटी कामगार ठेवल्यास त्यांना या कायद्यानुसार सर्व सुविधा, नियमानुसार वेतन, पीएफ, भत्ते आदी द्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येक कंत्राटदार विविध नावांच्या अनेक कंपन्या स्थापन करून प्रत्येक कंपनीत १९ कामगार असल्याचेच दाखवतो. एमआरटीयू किंवा महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन अॅक्टनुसार एखाद्या कारखान्यात किंवा आस्थापनेत १० टक्क्यांपेक्षाही कमी कामगार एकत्र येऊन आपली संघटना स्थापन करून आपले हक्क मागू शकतात, ही संख्या खूपच कमी असल्याचे गुंतवणूकदारांना व सरकारला वाटते आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

आता आपल्याच मराठी कामगारांनी कठोर संघर्षातून मिळवलेले हे कायदे बदलावेसे सरकारला का वाटत असावे? याचे कारण प्रभात पटनायक, समीर अमिन, अगदी काही प्रमाणात अमर्त्य सेन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांनाही जे वाटते, ते थोडक्यात लक्षात घेणे गरजेचे आहे. भांडवलशाहीचे सर्वात प्रगत रूप साम्राज्यवाद असते. नवउदारवादी अर्थकारणात भांडवल कुठल्या देशाचे आहे, याला महत्त्व नाही. वित्तीय भांडवल कुठूनही कुठेही जाण्याची अमर्याद मुभा, हेच त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे त्या भांडवलाची गुंतवणूक आपल्या देशात किंवा राज्यात, अथवा जिल्ह्या-तालुक्यात झाली नाही, तर ती दुसरीकडे होणार, अशी कायमची भीती राज्यकर्त्यांमध्ये असते. त्यामुळे एकेकाळी राज्यकर्ते हे भांडवलशाहीचे प्रवर्तक असूनही गुंतवणुकीबाबत निःपक्षपाती भूमिका घेत असत, ती आता संपून गेली आहे. त्यामुळेच हे भांडवलदार अधिकाधिक नफा कमावण्याच्या भूमिकेतून कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेतनातील, सोयी-सुविधांमधील कपातीवरच भर देतात. नवउदारवादातून जगभरात वाढीस लागलेल्या प्रचंड बेरोजगारीतून मार्ग कसा काढावा, याबाबत आता युरोपातील प्रगत राष्ट्रेही गंभीर विचार करीत आहेत. त्याचवेळी भारतासारखी तिसऱ्या जगातील राष्ट्रे मात्र, विकासाच्या नावाखाली या धोरणांना बळी पडण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. नवउदारवादी धोरणांमुळे जगभरात असमानता वाढत आहे. त्यातून हिंसाचार कसा वाढतो आहे, याचे केंब्रिज विद्यापीठातील अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचे प्राध्यापक व अभ्यासक हा-जून चँग यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक लेखन केले आहे. हिंसाचारामागील कारणे अनेकदा वरवर सांस्कृतिक-सामाजिक घटना व घडामोडींमध्ये असल्याचे वाटते. प्रत्यक्षात मात्र आर्थिक असामनता हेच त्यामागील मूळ असते, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: finally a push for labour reforms

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात
  • पुणे: चाकणमधील एका फ्लॅटमध्ये ७० कोब्रा नाग सापडले
  • दिल्लीत बळजबरी मुलींना किस केले, व्हिडिओ व्हायरल
  • बेस्ट बसने अचानक घेतला पेट; कारही जळाली

FROM WEB

Your support can help keep 16-year-old alive!

Milaap

Little Vinayak needs help surviving a stroke!

Milaap

Save Shrayansh from a life-crippling disorder

Milaap

FROM MAHARASHTRA TIMES

चरख्यावर मोदींच्या फोटोवरून शिवसेनेची टीका

मुंबई मॅरेथॉन अडचणीत, महापालिकेची नोटीस

हार के बाद ही जीत है

From the Web

More from Maharashtra Times

Little Aadithyan needs your urgent help!

Milaap

Own monthly rent generating property for as little as 10 lac

Property Share

This Mechanic needs your help to save his son

Milaap

Grade A commercial property leased to blue-chip tenant @ 9%

Property Share

The last chance for little Arisha to survive

Milaap

​ मुंबई @ १२.५

BSF अधिकारी करतात रेशनचा 'काळाबाजार'

विजय मल्ल्यांकडून २७३ कोटींचे हस्तांतर

आदित्य ठाकरे यांच्या कारला अपघात

राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसचा थंड प्रतिसाद

धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • तुर्कीश विमान अपघातात किमान ३२ जण ठार
  • सुप्रीम कोर्टाच्या बंदीनंतरही जलीकट्टूचे आयोजन
  • काश्मीरः हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
  • ओबामा डेमोक्रॅट्सच्या नेतेपदावर कायम राहणार
  • वॉशिंग्टनमध्ये निघणार महिलांची भव्य रॅली
  • पोलिसाचा महिलेवर बलात्कार, FIR दाखल
  • दिल्लीः दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम
  • शिमलामध्ये हिमवृष्टी, तापमान आणखी घसरले
  • ही माझी घरवापसी, काँग्रेस प्रवेशानंतर सिद्धूंची प्रतिक्रिया
  • जम्मू-काश्मीर विधानसभेत आरोप-प्रत्यारोव आणि गोंधळ

Around the Web

Help Goku get urgent heart transplant!

Milaap

Grade A commercial property leased to blue-chip tenant @ 9%

Property Share

Help this father save his 4-month-old baby!

Milaap

Grade A commercial property leased to blue-chip tenant @ 9%

Property Share

More from MT

गांधीजींच्या जागी मोदी; विरोधी पक्षांची टीका

मद्यविक्रीसाठी ‘डायव्हर्जन’?

ब्रोकर शुल्कात सेबीकडून कपात

टाटा समूहावर ‘चंद्रा’चे राज्य!

महाराष्ट्र बातम्या

  • 'दादर'वर भाजपचा डोळा तर शिवसेनेची खेळी
  • राष्ट्रवादीचंही 'डिड, यू नो?'; सेनेवर शरसंधान
  • मा. गो. वैद्यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या!- सेना
  • सेननं स्वीकारलं मनसेचं आव्हान; चुरस रंगणार
  • ‘सैनिकांची कॅन्टिनही आता होणार कॅशलेस’

महाराष्ट्र बातम्या

  • जय जय राष्ट्र महान!
  • शिकवीन मराठीचा धडा
  • उमटतायंत शिणुमाच्या पाऊलखुणा!
  • सावध ऐका कामगार कायद्यांच्या हाका
  • ऑनलाइन मराठीची बोलु कौतुके