घडताना, घडवताना....
Share on Facebook
घडताना, घडवताना....
Mar 9, 2013, 02.34 AM IST
-
ऋतुजा
सावंत
विदर्भ,
मराठवड्यात
सुरू
असलेल्या
दीपशिखा
प्रेरिका
प्रकल्पातील
मुली
वेगळ्या
वाटेवरच्या.
स्वतः
घडल्यानंतर
इतर
मुलींनाही
घडवू
पाहणाऱ्या...
स्त्री
सक्षमीकरणाचे
वारे
आता
वेगाने
वाहू
लागले
आहेत.
महिला
संघटनांपासून
सरकार
पातळीवर
नवनव्या
उपाययोजना
राबवण्यात
सुरुवात
झाली.
हे
खूप
मोठ्या
प्रमाणात
व्हायला
हवं,
याची
जाणीव
होऊ
लागली.
खरंतर
या
आधीही
सक्षमीकरणाचे
लहान-
मोठे
प्रयोग
सुरूच
होते.
यातून
अनेक
महिला
घडल्या,
आपल्यापुरता,
आपल्या
भोवतालच्या
समाजापुरता
सक्षम
झाल्या.
केवळ
शहरात
नव्हे,
तर
गावखेड्यातही.
शहरातली
मुलगी
आज
खूप
वेगाने
बदलली,
पोशाखापासून
विचारांपर्यंत,
थोडक्यात
मॉडर्न
झाली.
पण
काळानुसार
गावाकडच्या
मुलीही
बदलल्या.
पोशाखाने
नसतील
कदाचित
पण
विचाराने
नक्कीच.
केवळ
स्वतःचा
उत्कर्ष
नाही,
तर
इतर
मुलींना
घेऊन
पुढे
जाण्याची
वृत्ती
गावांमध्ये
अधिक
दिसून
येते.
म्हणूनच
याच
एकजुटीच्या
बळावर
या
मुली
बालविवाह,
दारुबंदी
यांसारख्या
सामाजिक
प्रश्नांविरोधात
धैर्याने
उभ्या
राहतात.
युनिसेफतर्फे
किशोरवयीन
मुलींसाठी
सुरू
असलेल्या
प्रकल्पातही
अनेक
प्रेरिकांचा
प्रवास
थक्क
करून
जातो.
वर्धा,
चंद्रपूर,
जालना,
लातूर,
औरंगाबाद,
नंदूरबार
येथील
प्रेरिकांनी
शिक्षणापासून
गावाची
सुधारणा
होईपर्यंत
विविध
प्रकारचे
यशस्वी
लढे
दिले.
त्यातून
त्या
स्वतः
घडल्या
आणि
अनेकींना
घडवलंही.
वीणा
शिंदे (
नाव
बदलले
आहे)
लातूरमधली.
१३व्या
वर्षी
लग्न
झालं.
तेव्हा
सहावीत
होती.
लग्नानंतर
दोन
वर्ष
माहेरी
असल्याने
पुढे
शिकली.
तेव्हाही
मंगळसूत्र,
जोडवी
लपवून
ती
शाळेत
जायची.
नंतर
सासूने
सासरी
येण्याचा
आग्रह
धरला.
शिक्षणाला
ब्रेक
मिळाला.
पण
वीणाने
शिक्षकांना
पत्र
लिहून
घरच्यांना
समजवण्याची
विनंती
केली.
अखेर
शाळेत
न
जाता
परीक्षा
देण्याची
परवानगी
सासूने
दिली.
दहावीच्या
परीक्षेत
ती
तालुक्यात
पहिली
आली.
नवं
बळ
मिळालं.
नंतर
तिने
बचत
गट
सुरू
करण्यात
पुढाकार
घेतला.
बचत
गटाचं
काम
वाढत
गेलं
आणि
तिने
२५०
बचतगटांची
स्थापना
केली.
आता
ती
प्रेरिका
म्हणून
काम
करते.
सैन्यदलात
जाण्याचं
माझं
स्वप्न
होतं.
ते
मी
दुसऱ्या
अर्थाने
पूर्ण
करत
आहे.
याचं
अधिक
समाधान
आहे,
असं
वीणा
सांगते.
लातूरच्याच
सुचिता
माने (
नाव
बदलले
आहे)
हिने
दारुबंदीसाठी
संघर्ष
केला.
इतर
महिलांना
एकत्र
करत
ग्रामसभेत
दारुबंदीचा
ठराव
संमत
करून
घेतला.
दरम्यानच्या
काळात
विरोधकांकडून
धमक्या
आल्या.
पण
ती
बधली
नाही.
आज
त्या
गावात
नऊ
महिने
दारुबंदी
आहे.
शिवनंदा
बादुरहे
हिनेही
गैरप्रकाराविरोधात
आवाज
उठवला. '
दीपशिखा'
चं
प्रशिक्षण
घेतल्यानंतर
गावसुधारणेचा
ध्यास
तिने
घेतला.
गावातील
पुरुष
मंडळी
जुगारात
पैसा
घालवतात.
ते
रोखलं
पाहिजे
हे
तिच्या
लक्षात
आलं.
तिने
जुगार
अड्डे
बंद
करण्याचा
निश्चय
केला.
या
लढ्यात
तिने
पुरुषांनाही
विश्वासात
घेतलं.
अन्यथा
हा
प्रकार
बंद
झालाच
नसता,
असे
ती
सांगते.
रेश्मा
कदमची (
नाव
बदलले
आहे)
कथा
जरा
वेगळी.
घरची
परिस्थिती
बेताची.
लहानपणी
वडिलांचं
निधन
झालं.
रेश्माचं
लग्न
चांगल्या
घरात
झालं.
नवरा
सैन्यात.
सुरुवातीला
सगळं
सुरळीत
होतं.
काही
दिवसांनी
तिला
मुलगी
झाली.
नवरा
नाराज
झाला
आणि
त्याने
तिच्यावर
संशय
घेण्यास
सुरुवात
केली.
तिला
मारझोड
करू
लागला.
शेवटी
सगळं
सोडून
ती
माहेरी
गेली.
पदरात
दोन
मुलं.
भावाच्या
बायकोचंही
निधन
झाल्याने
त्याची
दोन
मुलं
हिच्याकडेच.
रेश्मा
सुरुवातीला
खचून
गेली.
पण
नंतर
तिने
यातून
उभं
राहायचं
ठरवलं.
दीपशिखाच्या
माध्यमातून
तिला
दिशा
सापडली
आणि
तिने
किशोरवयीन
मुलींना
प्रशिक्षण
देण्याचा
चंग
बांधला.
सुरुवातीला
बरेच
अडथळे
आले.
प्रशिक्षणाच्या
ठिकाणी
गावकरी
खडे
मारू
लागले.
पण
रेश्मा
थांबली
नाही.
अखेर
गावकऱ्यांनाही
याचं
महत्त्व
पटलं.
आता
रेश्मा
नव्याने
जगते
आहे.
मुलींना
शिकवताना
स्वतःचे
दुःख
विसरते
आहे.
या
प्रत्येकीचा
लढा
वेगळा,
पण
ध्येय
एकच
सुधारणेचं.
या
सुधारणा
त्यांच्या
गावापुरत्या
मर्यादित
असतील
कदाचित,
पण
या
अशा
सुधारणांमधूनच
मोठा
बदल
घडत
असतो.
त्यांचं
हे
घडणं
आणि
घडवणं,
महिला
सक्षमीकरणासाठी
खरंच
प्रेरणादायी
ठरेल.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी
महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करासर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ
- रणदीप-काजलच्या किसवर, काजलचे स्पष्टीकरण
- सचिन आणि लता मंगेशकर यांचा तो मॉर्फ केलेला तन्मयचा व्हिडीओ
- पाच हजार लोकांसमोर सलमानने कसा घातला लंगोट?
- अक्षयने जॉनला 'सांड' म्हटल्यानंतर त्याने काय केले पाहा!